राजकारणात चौकशा होतच असतात.कठीण प्रसंग येतच असतात पण मी घाबरणारा नाही आणि आता पलटीही मारणार नाही.बचेंगे तो और भी लढेंगे',असा निर्धार माजी आमदार दिलीप माने यांनी बोलून दाखवला.त्यांनी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर येथे शिवशंकर तरुण मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.ते पुढे म्हणाले,“दक्षिण सोलापूरच्या ५५ गावांत स्पर्धा लावण्याचे काम काही मंडळी करत आहेत.विरोधी ग्रामपंचायतीच्या चौकशा लावून त्रास देण्याचे काम सुरू आहे.अशाने निवडणुका जिंकता येतील,असे त्यांना वाटते पण तसे होत नाही.गावांत राजकारण नव्हे,तर विकास महत्त्वाचा असतो.असे ते म्हणाले.
यावेळी माजी आमदार दिलीप माने यांच्यासह अप्पासाहेब काळे,माजी सभापती अप्पाराव कोरे,रमेश आसबे,अप्पासाहेब काळे,गंगाधर बिराजदार,चंद्रकांत खुपसंगे,प्रथमेश पाटील,विंचूरचे सरपंच बाळासाहेब पाटील,शंकरनगरचे सरपंच सुभाष चव्हाण,उपसरपंच संजय जाधव,निंबर्गीचे उपसरपंच पीरसाहब हवालदार,गजानन नांगरे,राम पवार,संजय राठोड,संयोजक तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील राठोड,देविदास राठोड,रवी राठोड,श्रीमंत पुजारी,शिवानंद मधुकर राठोड,विजय जाधव,लता
उमदीकर,रमजान नदाफ,गजानन राठोड उपस्थित होते.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलि
त केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments