दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मरिआई समाजाला रेशन कार्ड व धान्य मिळणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दक्षिणचे तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले.मंद्रुप येथील मरिआई समाज अनेक वर्षापासून रेशनकार्ड आणि अन्नधान्यापासून वंचित आहे.यासह समाजाच्या अनेक समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष मशाप्पा कोळी,जेष्ठ सेलचे शिवानंद हिरेमठ,अनमोल केवटे,विश्वनाथ कुमठेकर यांनी तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन दिले.यावेळी सुर्यकांत मरिआईवाले,सुरेश मरिआईवाले,दत्ता मरिआईवाले,रगप्पा मरिआईवाले,वसंत मरिआईवाले,सुभाष मरिआईवाले,विजय मरिआईवाले,हेसर्ज मरिआईवाले,सुखदेव मरिआईवाले,चंद्रकांत मरिआईवाले याच्यासह मरिआई समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments