Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शिरवळ येथे शेळ्यांना पाणी पाजले म्हणून एकाला चौघांकडून एकाला काठीने मारहाण करुन जीवे मारण्याची दिली धमकी; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल

शिरवळ येथे शेळ्यांना पाणी पाजले म्हणून एकाला चौघांकडून एकाला काठीने मारहाण करुन जीवे मारण्याची दिली धमकी; वळसंग पोलीसात गुन्हा दाखल




दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथे शेळ्यांना पाणी पाजले आणि ज्वारीची रास केलेला भुस्सा चारला म्हणून चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागनाथ शिवशंकर गंभीरे (वय ३६, रा. शिरवळ, ता. द. सोलापूर) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत चन्नप्पा कोळी, गुरूशांत चन्नप्पा कोळी, चन्नाप्पा महादेव कोळी व लक्ष्मीबाई चन्नाप्पा कोळी यांच्याविरोधात दि. 20 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वळसंग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास शिरवळ फाट्यावर असलेल्या शेतात फिर्यादीला शेतातील विहिरीच्या पाण्याचा व शेतातील ज्वारीचे रास केलेला भुसा शेळ्यांना का चारला व पाणी का पाजले या कारणावरून लाकडी काठीने, हाताने जबर मारहाण करीत शिवीगाळ करीत असताना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाणी नंतर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार माळी हे अधिक तपास करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

 ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

Post a Comment

0 Comments