दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद साखर कारखाना कार्यस्थळावर वळसंग पोलिस ठाण्याच्या वतीने उस वाहतूक करणा-या बैलगाडया,ट्रक व ट्रॅक्टर वाहन चालकांना वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगल्ले यांनी रिफ्लेक्टर लावण्या संबंधी मार्गदर्शन केले.तसेच अपघात टाळण्यासंबंधी करावयाच्या विविध उपायोजना संबंधी मार्गदर्शन केले.यावेळी जयहिंद साखर कारखान्याचे अध्यक्ष गणेश माने देशमुख,वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल सनगल्ले,पीएसआय पाटील,पोलीस अंमलदार बंदिछोडे,रामदास मालचे यांच्यासह ऊस वाहतूक करणारे चालक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....
0 Comments