औज मंदुप येथे एका वस्तीला आग लागल्याने शेतीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक; सुमारे 3 लाख किंमतीच्या मुद्देमालाचे नुकसान
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंदुप येथे तुकाराम यल्लप्पा गायकवाड यांच्या वस्तीला दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेतीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे दोन ते तीन लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालाचे नुकसान झाले आहे.
यामध्ये शेती उपयोगी साहित्य व संसारोपयोगी जळून झाले खाक झाले आहे.
आग लागल्यानंतर शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी गोठ्यातील जनावरे, गायी, शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या बाहेर काढल्याने सुदैवाने त्यांना वाचविण्यात यश आले. या अचानक लागलेल्या आगीत तुकाराम यल्लप्पा गायकवाड यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जीवनोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय मदत द्यावीत अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी केली आहे.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...
0 Comments