मतांचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पोकळ आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करु नये; जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील
जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात स्वतःवरील उपचारासाठी बुधवारी, दुपारी 2 वाजेच्या सुमारास गेले होते. परंतु तेथे तपासणी फी 300 रुपये घेऊन डाॅक्टरांनी औषधाची चिट्टी लिहून दिली. आयुष्यमान भारत ही आरोग्य योजना केवळ कागदावरच असून प्रत्यक्ष रुग्णालयाचा लाभ मिळत नाही. यासंदर्भात केवळ मतांसाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पोकळ आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करु नये, अशी विनंती बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी
बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक सागर कोळी
97636 21820
हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट
ल
0 Comments