लोकसभा निवडणुकीपुर्वी सीना नदीत पाणी नाही सोडल्यास नंदूरसह सीना नदीकाठची गावे लोकसभा मतदानावर टाकणार बहिष्कार...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूरसह अन्य सीना नदीकाठची गावे सीना नदीत पाणीच नसल्याने लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील शेतकर्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे सीना नदीत पाणी नाही. त्यामुळे शेतातील पिके करपून जात आहेत. तसेच पाण्यावाचून जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आमच्या शेतीपीकांची आणि जनावरांची काळजी नाही. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर सीना नदीत पाणी नाही सोडल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा नंदुर येथील शेतकरी विजय नागणे, इब्राहीम नदाफ यांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
यावेळी नंदुरसह तेलगाव भीमा, तेलगाव सीना, डोणगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...
बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक सागर कोळी
97636 21820
हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट
ल
0 Comments