दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथून काँग्रेस पक्षाच्या 'जनसंवाद यात्रेस' आज शनिवारी सुरुवात करण्यात आली.यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून या 'जनसंवाद यात्रेची' सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते अशोक देवकते म्हणाले की,माळकवठा गाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.या गावातून नेहमीच काँग्रेस पक्षाला बहुसंख्य मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी काॅग्रेस पक्षाचे दक्षिण तालुका अध्यक्ष हरीष पाटील यांच्यासह तालुक्यातील अन्य काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.
0 Comments